- मुखपृष्ठ
- शालेय पोषण आहार
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- शाळा सिद्धी
- शासन निर्णय
- शिक्षणाचा अधिकार
- पालकांसाठी
- मोबाईल एप्स
- स्पर्धा परीक्षा तयारी
- नवोदय / शिष्यवृत्ती
- शालेय रेकॉर्ड
- आरोग्य मंत्र
- थोरांचा जीवनपट
- कथा/ कादंबरी
- सेवा अधिनियम
- सूत्रसंचालन
- ई - पाठ्यपुस्तके
- करियर मार्गदर्शन
- चला पर्यटनाला !
- कृतियुक्त अध्यापन (ABL)
- सेवापुस्तकातील नोंदी
- शालेय अभिलेखे
- संचमान्यता नियमावली
- महिलांविषयक कायदे
- जीवन प्रेरणा
- वाचनिय लेखसंग्रह
- वाचनिय कवितासंग्रह
- सामान्यज्ञान
- कोरे फॉर्म / तक्ते
- इतर महत्वाचे
- स्काऊट व गाईड
- मूल्यवर्धन
- भाषणे / जयंती / पुण्यतिथी
- संगीतमय पाढे
- सॉफ्टवेअर गॅलरी
- श्रीमंतीचा पासवर्ड
- ब्लॉग निर्मिती
- ऑनलाईन स्वाध्याय उपक्रम
Saturday, 10 June 2017
Thursday, 1 June 2017
जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक
एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.
अग कमला उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव.
अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
ग:-गङचिरोलि, गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ला:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
पा:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव, जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोली
ब:- बिड, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
व:- वर्धा, वाशिम
अग कमला उठ पाय धु , रस ,भजॆ ,चहा बनव.
अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
ग:-गङचिरोलि, गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ला:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
पा:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव, जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोली
ब:- बिड, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार
व:- वर्धा, वाशिम
25 मुद्दे - निकष आणि गुण
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष
खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.
प्रगत शाळा निकष आणि गुण
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)
२) शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)
३) शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)
४) प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान
१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)
५) कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)
६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)
७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)
८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)
९) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)
१०) वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)
११) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)
१२) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)
१३) वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)
१४) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)
१५) कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)
१६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)
१७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)
१८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)
१९) मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)
२०) प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)
२१) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)
२२) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)
२३) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)
२४) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)
२५) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)
सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ६० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.
खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.
प्रगत शाळा निकष आणि गुण
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)
२) शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)
३) शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)
४) प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान
१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)
५) कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)
६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)
७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)
८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)
९) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)
१०) वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)
११) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)
१२) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)
१३) वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)
१४) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)
१५) कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)
१६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)
१७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)
१८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)
१९) मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)
२०) प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)
२१) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)
२२) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)
२३) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)
२४) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)
२५) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)
सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ६० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.
बळीराजाचा संप
आमचंच खाऊन भडव्यांनो
हात बुडाला पुसता काय..
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय....
लक्षात ठेवा, या ठिणगीचा
जेव्हा कधी वणवा होईल
तेव्हा मात्र तुमच्यावर
घान खायची वेळ येईल,
घान केलीय तुम्हीच सारी
अन् आमच्या तोंडाला पुसता काय
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय..
काल परवा कुणीतरी
पंढरपुरात बोललं
पर्यायी व्यवस्था उभारण्याचे
गुपित नवं खोललं...
कमी पडेल जे काही
त्याची आयात करणार म्हणे....
साहेब, जे करायचे ते करा
सत्ता तुमची गुलाम आहे
तुमच्या आयात निर्यातीला
आमचा आता सलाम आहे
वस्तू बाहेरुन आनता येईल
पण बाप आयात कराल काय
अन् निवडणूक आल्यावर
पाय त्यांचेच धराल काय..
असो....
साहेब, लाखो शेतकरी बापांनी
आत्महत्या केल्यायेत
आता उरलेल्यांना तरी जगू द्या
अन् आमच्या घामाचं मोल आता
आमच्याच खिशात उगू द्या...
हनुमंत चांदगुडे
सुपे (बारामती)
हात बुडाला पुसता काय..
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय....
लक्षात ठेवा, या ठिणगीचा
जेव्हा कधी वणवा होईल
तेव्हा मात्र तुमच्यावर
घान खायची वेळ येईल,
घान केलीय तुम्हीच सारी
अन् आमच्या तोंडाला पुसता काय
आम्ही चाललोय संपावर
म्हणून आम्हाला हसता काय..
काल परवा कुणीतरी
पंढरपुरात बोललं
पर्यायी व्यवस्था उभारण्याचे
गुपित नवं खोललं...
कमी पडेल जे काही
त्याची आयात करणार म्हणे....
साहेब, जे करायचे ते करा
सत्ता तुमची गुलाम आहे
तुमच्या आयात निर्यातीला
आमचा आता सलाम आहे
वस्तू बाहेरुन आनता येईल
पण बाप आयात कराल काय
अन् निवडणूक आल्यावर
पाय त्यांचेच धराल काय..
असो....
साहेब, लाखो शेतकरी बापांनी
आत्महत्या केल्यायेत
आता उरलेल्यांना तरी जगू द्या
अन् आमच्या घामाचं मोल आता
आमच्याच खिशात उगू द्या...
हनुमंत चांदगुडे
सुपे (बारामती)
मराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मिळवण्यासाठी
मराठी माध्यमातुन इंग्रजी माध्यमात जाताना, कॉलेजच्या शेवटच्या वर्गात असलेलया विद्यार्थ्यासाठी “प्लेसमेंट” सुरु झाले होते आणि मी मी म्हणणारे हुशार विद्यार्थी सुद्धा बिथरलेले दिसत होते. म्हणून अशाच एका ‘हुशार’ विद्यार्थ्याला बोलावून विचारलं की “काय रे ८०% मार्क असताना का घाबरतोस?” – तो म्हणाला “मॅडम मी मराठी शाळेतून शिकलोय”!
तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की बहुतेक मराठी माध्यमाची पोरं निव्वळ ‘मराठी’ असल्याच्या न्यूनगंडामुळे मागे पडत चालली आहेत. म्हणजे ज्यांना इंग्रजी येत ते सुद्धा मी मराठी माध्यमातून शिकलोय, इंग्रजी शाळेतलया मुलांसमोर बोलताना मी चुकणारच अशा पूर्वकल्पना करूनच बोलतात किंवा किंबहुना बोलतच नाहीत आणि आयुष्याच्या उमेदीच्या क्षणी ठेचकळतात.
ज्या लोकांना या चक्रव्यूहातून बाहेर यायचे असेल त्यांच्यासाठी काही टिप्स:
१. मराठीचा अभिमान असावा पण म्हणून इंग्रजीचा द्वेष करू नये
कोणतीही नवीन भाषा शिकल्याने आपल्याला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकल्यामुळे तुमच्यातला मराठीपणा कुठेही लोप पावणार नाही हे ही समजून घ्या.
२. इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीनदातरी वाचा
आणि त्यातलया पाच शब्दांचे अर्थ समजून घ्या, शब्दसंग्रह जितका वाढवाल तितकाच तुमचा आत्मविश्वास पण वाढेल
३. इंग्रजी सिनेमे, मालिका नियमित पहाण्याचा प्रयत्न करा
सुरुवातीला उपशीर्षकां (subtitles) सहित पहावे.
(तरीही पहिले ५ सिनेमे कळणार नाहीत!) पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवावेत १० सिनेमांनंतर तुम्हाला subtitles शिवाय सिनेमे समजू लागतील. या मुळे नवीन इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार तुमच्या कानी पडतील आणि इंग्रजीतून विचार करण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होईल.
४. रोज अर्धातास तरी बोलणे
मित्र, मैत्रीण , आई बाबा किंवा आरसा यांच्या पैकी कोणा एका सोबतका होईना रोज अर्धातास बोला, ( काही सुचत नसेल तर पाहिलेल्या इंग्रजी सिनेमातले डायलॉग म्हणा, किंवा स्वतःबद्दल बोला, म्हणजे तुमचं नाव शाळा वगैरे) – मग तुमच्या चुका तुम्हालाच लक्षात येतील आणि या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घ्या.
५. पुस्तक फक्त वर्तमानपत्र वाचून शब्दसंग्रह वाढवणं कठीण आहे. इंग्रजी साहित्याला शिवल्याशिवाय त्या भाषेवर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा का होईना एक पुस्तक जरूर वाचावं. सुरुवातच करायची असेल तर सुधा मूर्तींच्या पुस्तकांपासून करा , इंग्रजी किती सोपं आहे हे ती पुस्तकं सांगतात…!
आणि सर्वात महत्वाची गोष्ट –
तुम्ही मराठी माध्यमातून शिकलाय ही समस्यां नसून एक संधी आहे. तुम्ही तुमची मातृभाषा पूर्णपणे आत्मसात केली असल्याने तुम्ही तिचा तर आस्वाद लुटताच (तुम्हाला पु.ल. कळतात…!) आता तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळत आहे हे ध्यानात ठेवा. हे ही लक्षात ठेवा की इंग्रजी ही आपली भाषा नसल्यामुळे तिचा वापर करताना आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहेच, फक्त चुकांची पुनरावृत्ती होणार नाही एवढं पहा.
तुमच्यासमोर अनेक लोक असे असतील जे मराठी माध्यमांतून शिकले पण असाखळीत इंग्रजी बोलतात. त्यांनी देखील वरील ५ युक्त्याच वापरल्या आहेत ह्याची खात्री बाळगा…आणि आत्मविश्वासाने कामाला लागा…!
श्रुती कुलकर्णी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर -3
विद्यावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी होते, हे खरेच; पण ते केवळ दलितांचे कैवारी होते असे रुजविण्यात आपण राजकीयदृष्ट्या कमालीचे यशस्वी झालो आहोत. बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्यात दलितेतर धर्मांध समाज जेवढा जबाबदार आहे, तेवढाच दलित समाजही जबाबदार आहे. त्यांच्या १२६ व्या जयंतीच्या विचारसोहळ्यात आजच्या सांस्कृतिक वास्तवाकडे पाठ करून परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकत नाही. एकतर तत्त्वनिष्ठ असे दलितांचे स्वतंत्र राजकारण असल्याचे चित्र आज दिसत नाही. दुसरीकडे, १९७१ साली तमाम दलितांचे ऊर्जास्थान असलेली दलितांची विद्रोही चळवळ अस्तित्वात आहे, असे धाडसाने सांगता येणार नाही. वेदना, विद्रोह आणि बंडाने पेटून उठलेले दलित साहित्य आज कुठे आहे? बाबुराव बागूल यांचे क्रांतीविज्ञान, सुर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, नामदेव ढसाळांची ज्वाला भरलेली विद्रोही कविता, रा. ग. जाधवांची समीक्षा, रावसाहेब कसबे, पानतावणे आणि यशवंत मनोहरांचे वैचारिक लेखन या गोष्टी आता दलित साहित्य आणि चळवळीच्या पटलावर नाहीशा होऊन इतिहासजमा होत आहेत.
संघटित दलितांची चळवळ अशी गोष्ट नव्या भांडवलशाहीने गिळंकृत करून दलितांना सुटे सुटे करण्यात येथील धर्मांध राजकारणी कमालीचे यशस्वी झाले आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे आज दलितांचे विशेषतः आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाही, दलित साहित्य किंवा दलित चळवळ म्हणावे असे हक्काचे सांस्कृतिक विचारपीठ कार्यान्वित नाही आणि आंबेडकरी जनतेचे प्रश्न सोडवणारी निर्णायक आर्थिक धोरण दलित समाजात नाही. जे काही आहे ते सारे भावनेच्या मनोऱ्यावर उभे आहे. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला की सारे प्रश्न सुटतात, असा समज दलित समाजात पसरला आहे. निळा गुलाल, निळ्या पताका, जयभीमचा नारा, पांढऱ्या शुभ्र वस्त्रांचे परिधारण अशा भावनिक आणि मिथकांच्या गोष्टीत दलित समाज अडकतो आहे. बुद्ध धम्माचे आचरण आणि बाबासाहेबांच्या प्रती आदरभाव प्रत्येक दलिताच्या मनात ओतप्रोत भरलेला असणे ही गोष्ट अभिमानाची नक्कीच आहे. मात्र, त्याला विचारसरणीची व्यवहारी जोड देण्यात प्रागतिक प्रवाह कमी पडले हे मान्य करायला हवे.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांपासून दूर जाण्याचे अनेक तोटे आंबेडकरी समाज अनुभवतो आहे. जे प्रागतिक आंबेडकरी सांस्कृतिक आचरण उभे राहायला हवे होते, ते राहिले नाही. उलट राजकारणाने सांस्कृतिक आचरणावर मात करून दलितांच्या माथी विघटनाचा शाप मारला. समग्र सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई एकाच जातीने लढून उपयोगाची नाही. ती लढाई जातिव्यवस्थेशी आहे, कर्मठ आणि कुंठित झालेल्या धर्मव्यवस्थेशी आहे, भांडवलशाहीशी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती वाढत्या असहिष्णुतेशी आहे. अशावेळी समविचारी जातींनी एकत्र येऊन आपले एक प्रागतिक राजकीय धोरण निश्चित करायला हवे. बाबासाहेबांचे स्वप्न संपूर्ण उपेक्षित सममाजाच्या उन्नतीचे होते.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील धर्मांध राजकारण ज्या पद्धतीने इतिहासातील घटनांचा मिथकांचा, प्रतीकांचा आणि महापुरुषांच्या नावांचा चलाखीने वापर करून लोकांच्या नावावर सांस्कृतिक आक्रमण करत आहे. हे आक्रमण कधी राजकीय निर्णयाने, कधी मन की बात करून, तर कधी देशद्रोही संबोधून केले जात आहे. विन्डी डोनिजर, पेरूमल मुरूगन, रोहित वेमुला, कन्हैया कुमार, गुरमेहर कौर, ही उदाहरणे ताजी आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्यांची जखम अजून भरलेली नाही. शिवाय, भांडवली राजकारणाला जे हवे आहे, ते घडवून आणण्यासाठी माणसांच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रवादाच्या व्याख्या बदलत आहेत. राष्ट्रवाद ही गोष्ट दुधारी शस्त्र आहे, असे बाबासाहेबांनीच ‘पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी’ या ग्रंथात सांगितले आहे.
संसदीय राजकारणात धर्माचे वाढते महत्त्व लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असे मत बाबासाहेबांनी मांडले होते; पण तमाम दलित-उपेक्षित आणि बहुजनांच्या मनावरील धर्माचे गारूड उतरत नाही. राजकारण, शिक्षण, व्यापार, शेती यासारख्या अनेक क्षेत्रांत जात आणि धर्माने बस्तान पक्के केले आहे. आंबेडकरवादापुढचे आजचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचे पुनर्रोपण करण्याचे आहे. यासाठी, बाबासाहेबांनी धर्मचिकित्सा करणे, पोटजाती नष्ट करणे आणि आंतरजातीय विवाह करणे हे प्रभावी उपाय सांगितले होते; पण त्यांकडे प्रागतिक प्रवाहांनी पुरेसे लक्ष दिले नाही.
भारतातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय बाबासाहेबांच्या स्वप्नातला धर्मनिरपेक्ष भारत उभा राहणार नाही आणि गौतम बुद्धांना अपेक्षित असलेली शांततामय करुणाही मनामनांत रुजवता येणार नाही. सध्या धर्माच्या हातात राजकीय सत्ता गेल्याने आणि राजकारणाचे दोर भांडवलदारांच्या हातात गेल्याने प्रागतिक विचारविश्व धोक्यात आले आहे. त्याचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर सर्व समविचारी प्रागतिक पक्ष, संघटना, संस्था, व्यक्ती व समूहांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रागतिक चळवळी फोडून त्यातील नेत्यांना विकत घेण्याचे षड्यंत्र इथले राजकारण सतत करील, यात शंका नाही.
परिवर्तनवाद्यांनी ब्राह्मण्याऐवजी ब्राह्मणांचा द्वेष करण्याने व आंबेडकरवाद्यांनी कम्युनिस्टांचा द्वेष करण्याने पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली. ‘बुद्ध आणि मार्क्स’, ‘बुद्ध की मार्क्स’ अशा शब्दच्छलात अडकवून आंबेडकरवाद व्यापक होऊ न देण्यात प्रागतिक विचारवंत अडकून राहिले. दलित साहित्य आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य? अशा शाब्दिक कोट्या करत दलित लेखकांची सर्जनशीलता गोठली. वेदना आणि विद्रोहाची आग पेरत दलित कवितेची पन्नाशी गेली. दलित आत्मकथनेही आवर्तात सापडली. दलित रंगभूमीची पीछेहाट झाली. दलित नेत्यांची फाटाफूट झाली. अशा अनेक पडझडीतून क्रांतीचा वारसा असलेली दलित चळवळ आज जात आहे.
प्रतिगामी आणि धर्मांध शक्तींनी महाराष्ट्रातील ओबीसी जातींना आणि हिंदू दलित जातींना राजकीयदृष्ट्या आपल्याकडे वळवून आंबेडकरी चळवळीला एकाकी पाडले. आता तर डॉ. आंबेडकर-हेडगेवार, आंबेडकर-गोळवळकर अशी तुलना करून दलित चळवळीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण आंबेडकरी समाज अजूनही जागा आहे, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आंबेडकरवाद नावाचे सुंदर प्रागतिक तत्त्वज्ञान त्याच्या हातात आहे. आता केवळ बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषात न अडकता हा समाज तमाम बहुजन समाजाशी वैचारिक नाते ठेवून आणि समविचारी, धर्मनिरपेक्ष जाती-धर्मांशी सांस्कृतिक मैत्री करून जागतिकीकरणात नवा व्यापक प्रागतिक आंबेडकरवाद उभा करील, अशी आशा आहे.
डॉ. मिलिंद कसबे
(लेखक मराठीचे प्राध्यापक आहेत.)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर -2
शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन अशी शेतं एकत्र करून शेतकर्याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.
त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्यांचे मोर्चे काढले.
त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली.
शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.
देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.
डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
-- प्रा. हरी नरके
काही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - सर्दी, खोकला, ताप येत नाही.
२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.
३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.
४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.
५) स्मरण शक्तीसाठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.
६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.
७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.
८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे -
हाडे मजबूत होतात.
९) ऐकू न येणे-
चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे
१0) शरीरशुद्धी साठी-
वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.
११) जुलाबासाठी-
चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.
१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.
१३) मुळव्याधासाठी-
अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.
१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.
15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.
१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.
१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.
१८) पोटाच्या आजारावर -
वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.
१९) कानाच्या पडद्याला भोक -
उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.
२०) हात पायाला घाम येणे -
सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.
२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर-
अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.
२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.
डॉ.स्वागत तोडकर
चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
चिकित्सालय,कोल्हापूर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔷जन्म : एप्रिल १४, इ.स. १८९१
🔷महापरिनिर्वाण : डिसेंबर ६, इ.स. १९५६
🔷जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश
🔷पत्नी: रमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
🔷अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
🔷आई: भिमाई रामजी आंबेडकर
🔷वडील: रामजी मालोजी आंबेडकर
🍁हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते.
🍁भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
🍁सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते.
🍁कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.
🔷सुरुवातीचे जीवन
🍀मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.
🍀डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
🍀इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
🍀रामजींनी इ.स. १८९८ साली कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.
🍀 इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला.
🍀इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरल
🍀अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली.
🍀इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.
🍀कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
🎓शिक्षण
📚पदवी-
एम.., पीएच. डी,. डी.एस्सी, एल्एल.डी., बॅरिस्टर अॅट लॉ.
📚प्राथमिक शिक्षण
भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.
🎓उच्च शिक्षण
📚बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.
📚एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते.
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली.
✴आंदोलने
🌀चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
🌀काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली.
२ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाडावर सोपवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.
✏पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला
🔷शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
🔷हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.
🔷भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.
🔷भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले.
१९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, अन्य कुणापेक्षाही जास्त आहे.
बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.
🌀धर्मांतर
बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली.व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.
🌀महापरिर्निवाण
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.
🙏बाबासाहेब आम्बेडकर🙏
⭐जीवनेतिहास (थोडक्यात)⭐
🔷 १४ एप्रिल इ.स.१८९१
🔶महू गावी जन्म.
🔷 इ.स.१८९६
🔶आई, भिमाईचे निधन
🔷 नोव्हेंबर इ.स.१९०० 🔶सातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
🔷 इ.स.१९०४
🔶एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
🔷 इ.स. १९०६
🔶रमाई यांचेशी विवाह
🔷 इ.स.१९०७
🔶मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
🔷 इ.स.१९०८ जानेवारी 🔶एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
🔷 इ.स.१९१२
🔶मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
🔷 इ.स. १९१३
🔶बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
🔷 जून इ.स.१९१५
🔶एम.ए.ची परीक्षा पास झाले.
🔷 जून इ.स.१९१६
🔶कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
🔷 इ.स.१९१७
🔶कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
🔷 जून इ.स.१९१७
🔶लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
🔷 इ.स.१९१८
🔶साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
🔷 नोव्हेंबर इ.स.१९१८
🔶सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
🔷 जून ३१ इ.स.१९२०
🔶साप्ताहिक मूकनायक सुरू केले
🔷 मार्च २१ इ.स.१९२०
🔶कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
🔷 जून इ.स.१९२१
🔶लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
🔷 मार्च इ.स.१९२३
🔶रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
🔷२० जुलै इ.स.१९२४
🔶बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
🔷 २० मार्च इ.स.१९२७
🔶चवदार तळे सत्यागृह
🔷एप्रिल ३ इ.स.१९२७
🔶बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
🔷सप्टेबर इ.स.१९२७
🔶समाज समता संघ स्थापन केला.
🔷 इ.स.१९३४
🔶परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
🔷 मे २६ इ.स.१९३५
🔶रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन
🔷 ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ 🔶येवला, येथे धर्मांतराची घोषणा
🔷 ऑगस्ट इ.स.१९३६
🔶स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
🔷 डिसेंबर इ.स.१९४०
🔶थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
🔷जुलै इ.स.१९५१
🔶भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
🔷मे इ.स.१९५३
🔶मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
🔷डिसेंबर २५ इ.स.१९५५ 🔶देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
🔷डिसेंबर 6 , इ.स.1956
🔶महापरिनिर्वाण
🌹बाबासाहेब आंबेडकर 🌹
📚यांनी व त्यांच्यावरील लिहिलेली काही निवडक पुस्तके📚
📕माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
📗हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
📘दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर, २००४
📙आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन.
📓भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म.श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
📔महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
📒डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
📗डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
📘गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
📓आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्मय गृह प्रकाशन.
📒आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्मय गृह प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
📔आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📗आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
📓बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
📙डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
📒आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
📔भीमकालदर्शन (दिनदर्शिका-संपादक सुहास सोनवणे
📗आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
📘ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
📓संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
📒डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
📕मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
📔डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई.
📗पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
📓डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
📒डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
📕भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
📔डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
📙भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
📓डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
📒डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
📕प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
📔डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
📗भीमप्रेरणा : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
📘संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
📓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
📒बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
📕ज्योतिराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन.
📔चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन.
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
📙विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
📓डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित).
📒आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
📕आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे.
📔आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल.
📗डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी - लेखक डॉ. य दि फडके 📘ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
📙सत्याग्रही आंबेडकर (संपादक सुहास सोनवणे)
📓बहुआयामी (संपादक सुहास सोनवणे)
📒शब्दफुलांची संजीवनी (संपादक सुहास सोनवणे)
📕डॉ. आंबेडकर आणि समकालीन (संपादक सुहास सोनवणे)
📔ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
📗आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार'- प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे
📘गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📙The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts (Sage publication-1993) (लेखक : डॉ. मा.स. गोरे)
📓Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies (लेखक - डॉ. एस.एस. धाकतोडे)
📒डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह, संपादक मनीष कांबळे)
📕माणूस त्याचा समाज व बदल -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धान्तन (लेखक : सुधाकर गायकवाड)
---------------------------------------------
🌹भारतरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचा कुळ परिचय 🌹
---------------------------------------------
⭐आजोबा: मालोजी सकपाळ
⭐वडील : रामजी मालोजी सपकाळ
⭐आई : भीमाताई रामजी सपकाळ
⭐आईचे वडील: धर्माजी मुरबाडकर
⭐आत्या : मीराबाई मालोजी सकपाळ
⭐भाऊ : आनंदराव रामजी आंबेडकर
⭐बहिण : मंजुलाबाई,तुळसाबाई, गंगूबाई रामजी आंबेडकर
⭐वहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर
⭐पत्नी : रमाबाई भिमराव आंबेडकर
⭐दूसरी पत्नी : डॉ सविता भिमराव आंबेडकर
⭐सासरे : भीकू धोत्रे ( वलंगकर )
⭐सासु : रखमा भीकू धोत्रे
⭐मेहुने : शंकरराव भीकू धोत्रे
⭐बहिनीचे पति :धर्माजी कोळेकर
⭐बाबांचे मुले-मूली : यशवंत,रमेश, इंदु, राजरत्न,गंगाधर
⭐सुन : मिराबाई यशवंत आंबेडकर
⭐नातवंडे : प्रकाश, रमाताई, भिमराव, आनंद
======================
Subscribe to:
Posts (Atom)